महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांचा संताप
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी)च्या कारभाराबाबत असभ्य, असंस्कृ त आणि असंसदीय वक्तव्य करणाऱ्या उमेदवारांविरोधात आयोगाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आयोगाच्या कार्यशैलीबाबत अयोग्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येईल, असा इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.
आयोगाकडून राबवल्या जात असलेल्या भरती प्रक्रियांबाबत अनेकदा प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि सार्वजनिक ठिकाणी उमेदवारांकडून चुकीच्या भाषेचा वापर करण्यात येत असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. अशा भाषेमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला बाधा येत असून, अशा उमेदवारांविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार आहे, तसेच आयोगाच्या स्वत:च्या अधिकारांचा वापर करून अशा उमेदवारांना परीक्षा देण्यापासून देखील वंचित ठेवण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी देखील आयोगाने असभ्य भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना कारवाईचा इशारा दिला होता.
आयोगाच्या या भूमिकेवर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे १८ ते २० लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करीत नाही. वेळेवर परीक्षा न घेणे, एकच एमपीएससी सदस्य नियुक्त असल्यामुळे विविध परीक्षांच्या वेळेवर मुलाखती न होणे, यूपीएससीच्या धर्तीवर अनुकरण आणि आधुनिकीकरण न करणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी नवीन पद्धतीचा अवलंब न करणे या गोष्टी याला कारणीभूत आहेत. यूपीएससीला जे जमते ते एमपीएससीला का जमत नाही?, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठपर्यंत खेळणार आहे?, असे प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …