ठळक बातम्या

महिलांचा अवमान करणे स्वभाव नाही, आता कोर्टातच बाजू मांडेन – आ. शेलार

मुंबई – मी जे बोललोच नाही आणि जे बोललो त्याचा विपर्यास करून जो बागुलबुवा उभा केला आहे, त्याविरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन, असे सांगतानाच महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसे आमचे संस्कारही नाहीत, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. ज्या पत्रकार परिषदेवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आजही युट्यूबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य, जे सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही मांडू. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच, असे शेलार म्हणाले.
अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करू लागले की, मग सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर कसा केला जातो हे गेली दोन वर्षे जनता पाहते आहेच. मी जे बोललोच नाही आणि जे बोललो त्याचा विपर्यास करून जो बागुलबुवा उभा केला आहे, त्याविरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन. महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसा आमचा संस्कारही नाही. महापौर किशोरीताई पेडणेकर यांचा आणि माझा गेल्या अनेक वर्षांचा स्नेह असून, आम्ही नगरसेवक म्हणून एकत्र काम केले आहे. महापालिका सभागृहात मुंबईकरांच्या विषयांवर अनेक वेळा कडवा संघर्षही झाला, पण कटूता, अपमान असे कधी घडले नाही. त्यामुळे आता त्यांच्याबाबत जे खोटे चित्र उभे केले जातेय ते त्यांनाही पटणार नाही, अशी माझी धारणा आहे. या मागचा बोलविता धनी कोण?, याची कल्पना मला आहे, असेही त्यांनी सांगितले. माझ्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आंदोलन सोडून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अशा असनदशीर दमदाटीला, दडपशाहीला घाबरणार नाही आणि जनसेवेचा घेतला वसा टाकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …