नाशिक – अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षलवादी असू शकत नाही. शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नव्हे, तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले. इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘सन्मान बाडगीच्या माचीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपस्थित होते. यावेळ शरद पवार म्हणाले की, पिढ्यान्पिढ्या या देशाचा मूळ मालक असलेल्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. राघोजी भांगरे यांचे स्मारक आपण उभारतो आहोत. आदिवासी समाजाची तरुण पिढी येथे आली याचा आनंद आहे. आदिवासींसाठी संघर्ष करावा लागेल. खरेतर अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी नक्षलवादी असू शकत नाही. पुढच्या आठवड्यात नक्षली भागात मी स्वत: जाणार आहे. तिथल्या तरुणांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवार पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या राज्याला भोसल्यांचे राज्य असे कुणी केले नाही, ते रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्याचे राज्य असे म्हटले जाते. भीमा-कोरेगावला ऐतिहासिक घटना घडली, पण त्याचा देशात वाद झाला. पण तिथे लढणारा व्यक्ती आदिवासी होता. बिरसा यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृ ती जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …