मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत सादर केले. उपमुख्यमंत्री अजित पवारही बोलायला उभे राहिले, पण शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भारावून गेले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. पवारांबद्दल भरभरून बोलताना एका क्षणी अजितदादा अत्यंत भावूक झाले. त्यावेळी त्यांनी मला फार काही सूचत नाही, शब्द बाहेर पडत नाहीत, अशी भावना व्यक्त करून आपले भाषण थांबवले. त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही हेलावून गेले होते.
पवार साहेबांबद्दल अनेक जण विचार करतात. त्यांच्या पद्धतीने ते विचार करतात. राज्यातील प्रत्येक घटकांवर साहेबांच्या विचाराचा ठसा आहे. त्यांची नोंद घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही. हे पवार साहेबांचे मोठेपण आहे. पवार साहेब हे साहित्यिक, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृ तिक विश्वात आख्यायिका बनून राहिले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला हिमालयाची उंची आणि सह्याद्रीचा भक्कमपणा आहे. अहोरात्र कष्ट करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सर्वांकडे बारकाईने लक्ष देणे, सर्वांना संस्कार देणे, सामाजिक बांधिलकी देण्यासाठी प्रोत्साहन देणे. त्यांनी केवळ आम्हालाच नाही तर लाखो तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी बळ दिले, प्रेरणा दिली. तुमच्या-माझ्यासारखे लाखो तरुण साहेबांकडे आधारवड म्हणून बघतात, असे सांगतानाच अजितदादांचा कंठ दाटून आला होता.
साहेब म्हणजे व्यक्ती नाही, तर ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असे जागतिक विद्यापीठ आहे. राज्यातील सर्वात तरुण काँग्रेस अध्यक्ष आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री असे विक्रम त्यांच्या नावावर आहेत. त्यांचा वाढदिवस म्हणजे महाराष्ट्रातील जाणत्या राजाचा हा वाढदिवस. शेतकऱ्यांच्या पाठिराख्याचा हा वाढदिवस. महिला, अल्पसंख्याकासाठी निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याचा हा वाढदिवस. राष्ट्रवादीच्या कुटुंबप्रमुखाचा हा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे. प्रत्येक घटकांपर्यंत त्यांचे विचार पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …