राज ठाकरेंनी जातीपातीच्या राज" />

ठळक बातम्या

“महाराष्ट्रात जातीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जन्मानंतर मोठा झाला”, राज ठाकरेंचा थेट आरोप!

राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर असा आरोप केला आहे.

raj thackeray on sharad pawar cast politics in maharashtra ncp

राज ठाकरेंनी जातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

“हा नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली आहे. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना त्यांनी याला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले.

“कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

“ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्याला जाती-पातींमध्ये खितपत ठेवायचं का आपण? पूर्वी फक्त नावं विचारल्यानंतर तुम्ही कुणापैकी असं विचारायचे. म्हणजे तुझी जात कोणती? पण हे फक्त तिथपर्यंतच होतं. पण आता अगदी शाळेपर्यंत हे उतरलंय.”, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

About admin

अवश्य वाचा

मुंबईत हाय अलर्ट!; खलिस्तान समर्थक गटांकडून दहशतवादी हल्ल्याचा धोका

मुंबई – खलिस्तान समर्थक गटांनी आखलेल्या दहशतवादी कारवायांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर मुंबईत हाय अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *