ठळक बातम्या

ही महिला तलावात राहून घालवते संपूर्ण दिवस

जगातील प्रत्येक व्यक्तीचे छंदही वेगवेगळे असतात. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला पाण्याची इतकी आवड असेल की तो स्वत:ला सतत पाण्यात ठेवत असेल, तर त्याला तुम्ही काय म्हणाल? अशीच काहीशी स्थिती पश्चिम बंगालमधील एका महिलेची आहे जी दिवसाचे १२ ते १४ तास पाण्यातच राहते. एवढेच नाही तर ती पहाटेच तलावाच्या शोधात निघते आणि त्यानंतर दिवसभर पाण्यात उभी असते.
हे प्रकरण पश्चिम बंगालमधील कटवा जिल्ह्यातील गोवई गावातील आहे. जिथे एक ६० वर्षांची महिला दररोज कित्येक तास पाण्यात उभी असते. महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, गेल्या २० वर्षांपासून ती सकाळी उठल्याबरोबर तलाव किंवा पाण्याची जागा शोधण्यासाठी बाहेर पडते. दररोज १२ ते १४ तास पाण्यात राहते. रोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी ती तलावात उतरते आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ती घरी परतते.

आम्ही तुम्हाला सांगतो की, ही महिला मानेपर्यंत पाण्यात स्वत:ला बुडवते आणि संपूर्ण दिवस तिथेच घालवते. तलावात राहून ती लोकांशी बोलते आणि तिथेच जेवणही खाते. घरी जायच्या वेळीच ती तलावातून बाहेर येते. या महिलेला एक विचित्र आजार आहे, जो तिला गेल्या २० वर्षांपासून त्रास देत आहे. त्या आजारामुळे तिच्या त्वचेची खूप जळजळ होते. ही जळजळ टाळण्यासाठी ती रोज सकाळी तलावात जाऊन बसते.
त्याचवेळी महिलेची मुलगी सांगते की, २० वर्षांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उन्हात येताच तिची त्वचा जळू लागली आणि तिला खूप गरमी जाणवायची. त्यानंतर पाण्यात उतरल्यावरच तिला आराम मिळत असे. त्यामुळे ती रोज पाण्यात राहते. ही महिला १९९८ पासून हे काम करत आहे. आता लोकांना समजू लागले आहे की, या महिलेचा आत्मा तलावातच स्थायिक झाला आहे, कारण तिचा संपूर्ण दिवस तलावातच जातो.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …