ठळक बातम्या

सर्व मुस्लिमांना आरक्षण देऊ नका; पण ५० जातींना तरी आरक्षण द्या -असदुद्दीन ओवैसींची ठाकरे सरकारकडे मागणी

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत महाराष्ट्रात मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या ५० जातींना आरक्षण देता येईल, असे म्हटले आहे त्यांना तरी आरक्षण द्या, अशी मागणी ओवैसींनी ठाकरे सरकारकडे केली आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालात महाराष्ट्रातील ५० जातींना शिक्षणात आरक्षण देता येतं, असं म्हटले आहे. कारण या जातींच्या सामाजिक राजकीय मागासपणाची आकडेवारी आणि माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे यानंतरही या जातींना शिक्षणात आरक्षण न देणं अन्याय आहे.
सरकारला आणखी कुणाला द्यायचं असेल, तर त्यांनी द्यावे. मुस्लिमांचे सामाजिक, शैक्षणिक मागासपण सिद्ध झाले आहे. उच्च न्यायालयानं देखील ते मान्य केले, तरीही सरकार मुस्लिमांना आरक्षण देत नाही. यानंतर आमच्याकडे बोट करून आम्ही धार्मिक असल्याचे म्हणतात. हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं ओवैसी यांनी सांगितले.
सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका; पण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या ५० जातींना आरक्षण देता येतं म्हटलंय त्यांना द्या. आधी सरकार भाजप-शिवसेनेचं होतं, आता थ्री इन वनचं सरकार आहे. हे थ्री इन वन देखील विसरून गेले. आता आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार करू शकतं याचा संसदेत कायदाही मंजूर झालाय. संविधान समानतेविषयी सांगतं. त्याआधारावर महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे, अशी मागणी ओवैसी यांनी केली.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …