* एसटी कर्मचारी कृती समितीच्या निर्णयाला केराची टोपली
मुंबई – परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठक घेत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करण्यात येईल असेपरिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर एसटी कर्मचारी कृती समितीनेही आंदोलन मागे घेत असल्याच जाहीर केले. त्यामुळे आजपासून राज्यातील एसटी वाहतुक सेवा सुरळित सुरु होईल अशी अपेक्षा होती, परंतु कृत्ती समितीच्या संप मागे घेण्याच्या निर्णय धुडकावत राज्यात अनेक एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे.त्यामुळे प्रवास्यांचे हाल झाले.
एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. विशेषत: सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. राज्यात इतरही ठिकाणी तुरळक का होईना एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील शेगाव डेपो मध्ये एसटी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. या आंदोलनाचा फटका संबंधीत जिल्ह्यात सर्वसामान्यांना बसला असून म्हणावी तेवढी एसटी सेवा राज्यात सुरळित सुरु झालेली नाही. तेव्हा यावर आता कसा तोडगा निघणार, आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीलेलं आहे.
एसटी कर्मचारी कृती समितीकडून फसवणूक
एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली आहे. कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. या आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितलं.