जगात अनेक प्रकारचे अन्न तयार केले जाते. प्रत्येक देशाची स्वत:ची वेगळी चव आणि स्वयंपाक करण्याची पद्धत असते. प्रत्येक देशाची पाककृती त्याच्या मसाल्यांमुळे प्रसिद्ध असते. मसाल्यांबद्दल बोलता आणि भारताचा उल्लेख नाही, हे कसे होऊ शकते. भारतात प्रत्येक राज्याचा आवडता पदार्थ वेगळा असतो. त्यांचे मसाले वेगळे आहेत, पण आज आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत, त्या देशातील लोक आपल्या अन्नात मातीचा वापर मसाल्याच्या रूपात करतात.
आम्ही बोलत आहोत, इराणच्या सुंदर होर्मुझ बेटाबद्दल. त्याला इंद्रधनुष्य बेट असेही म्हणतात. रंगीबेरंगी पर्वतांमुळे या बेटाला हे नाव पडले आहे. देशातील पर्वत वेगवेगळ्या रंगाचे आहेत. त्यामुळे याला इंद्रधनुष्य बेट असे नाव देण्यात आले आहे. या बेटावर राहणारे लोक त्यांच्या जेवणात मसाल्यांऐवजी मातीचा वापर करतात. तुम्ही विचार करत असाल की, अन्नामध्ये माती टाकल्याने ते खाण्यायोग्य राहणार नाही, पण तसे अजिबात नाही. खरेतर या देशाची माती खूप चविष्ट आहे. अशा प्रकारे, ती अन्नाची चव वाढवते.
होर्मुझ बेटाची माती चवदार आणि आरोग्यदायी आहे. येथे वेगवेगळ्या रंगाच्या डोंगरातून बाहेर पडणाºया वेगवेगळ्या रंगाच्या मातीची वेगळीच परीक्षा असते. हे लोक ही माती अन्नात मसाल्यांप्रमाणे मिसळतात. या बेटावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. हे लोक येथे येतात आणि माती खायलाही विसरत नाहीत. वास्तविक, हे बेट पर्शियन गल्फ जवळ आहे. अशा स्थितीत येथील जमिनीत खनिजे भरपूर आहेत. त्यात भरपूर लोह आहे आणि सुमारे ७० प्रकारची खनिजे आहेत.
या बेटावरील टेकड्यांवरही तुम्हाला मिठाचे ढिगारे पाहायला मिळतील. या पर्वतांवर बरेच संशोधन झाले आहे. ब्रिटनच्या भूवैज्ञानिक संशोधनाच्या मुख्य भूवैज्ञानिक डॉ. कॅथरीन गुडनफ यांनी सांगितले की, लाखो वर्षांपासून या टेकड्यांवर खनिजे साठून मातीचे रूप धारण केले आहे, पण त्यांची चव खूप खास आहे. इथले लोक रंगानुसार मातीची चव ओळखतात. तर तुम्हाला मातीचे मसालेदेखील वापरायला आवडतील.