मुंबई – भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. एकीकडे भाजपचे नेते खासदार वरुण गांधी हे पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू असतानाच वरुण गांधींच्या मातोश्री मनेका गांधींची ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनेका गांधी यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये मला समजले की, जितेंद्र आव्हाड हे म्हाडाकडून रुग्णालयांसाठी जमीन देण्यासाठी तयार आहेत. ही बाब जेव्हा मला समजली, तेव्हा मी त्यांच्याशी बोलले होते. तसेच ते जर या विषयावर गंभीर असतील, तर मी मुंबईत येईन. त्यानुसार मी आज इथे आले आहे. यावेळी प्राण्यांना वाचवण्याची लढाई मुंबईतून सुरू होणार का?, असे विचारले असता मनेका गांधी म्हणाल्या की, ही प्राण्यांना वाचवण्याची लढाई नाही, तर हा एक प्रयत्न आहे. ज्यामध्ये प्राणी आणि माणूस आनंदाने एकत्र राहील, असेही त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …