कराची – पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोठ्या प्रयत्नांनी सुरू झाले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघांनी यापूर्वी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजची टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये आहे. या मालिकेमधील दोन सामन्यांनंतरच पाकिस्तान टीमचे माजी क र्णधार वसिम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी यांच्यावर हात जोडण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमने वेस्ट इंडिज विरुद्ध पहिले दोन टी-२० सामने जिंकले आहेत. त्यानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क्लीन बोल्ड झाले आहे. पाकिस्तानी नागरिकांनीच त्यांना क्लीन बोल्ड केले आहे. बुधवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये फक्त ४ हजार प्रेक्षकच कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिकिटाचे दर निम्मे केले आहेत. तरीही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी खेचण्यात त्यांना अपयश आले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नामुश्कीमुळे त्यांच्या टीमचे माजी क र्णधार वसिम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी यांनी प्रेक्षकांना हात जोडून स्टेडियममध्ये सामना पाहावा अशी विनंती केली आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमने मागील महिन्यात चांगली कामगिरी केल्यानंतरही कराचीमधील रिकामे स्टेडियम पाहून खेद वाटतो. याचे कारण काय आहे हे मला माहिती आहे, पण मला ते तुमच्याकडून ऐकायचे आहे. क्रिकेट पाहायला येणारे प्रेक्षक कुठे आहेत आणि का? असा प्रश्न अक्रमने ट्विट करीत विचारला आहे. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिका फ्लॉप गेली आहे. या अनुभवानंतर आगामी एकदिवसीय मालिकेमध्ये प्रेक्षकांना नि:शुल्क प्रवेश देण्याचा विचार पीसीबी करीत आहे, असे वृत्त पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान, कराचीमध्ये बुधवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा ९ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर पाकिस्तानने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: smokes near me