* भारत, चीन, पाक आणि बांगलादेशमधील तब्बल ९८ शहरांचा समावेश
नवी दिल्ली – सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजत असतानाच प्रदुषित हवेनेमुंबईला आपल्या कवेत घेतले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. नवी दिल्लीतील लोकांचा वायू प्रदूषणाने श्वास रोखून धरलाय. मात्र, फक्त राजधानी दिल्लीच नव्हेतर भारतातील तब्बल ४६ शहरांतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचेचित्र आता समोर आले आहे. जगभरातील टॉप १०० प्रदुषित शहरांमध्येभारतातील तब्बल ४६ शहरांचा समावेश आहे. जगभरातील हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या आयक्यूएआय १ ने प्रदुषित शहराची यादी जाहीर केली आहे. यामध्येजगभरातील टॉप १०० प्रदुषित शहरांमध्येभारतातील ४६ शहरे, चीनमधील ४२ शहरांचा समावेश आहे. तर पाकिस्तानमधील ६ आणि बांगलादेशमधील ४ शहरांचा समावेस आहे. इंडोनेशिया आणि थायलँड या देशातील प्रत्येकी एका शहरांचा या यादीत समावेश आहे. या सर्व शहरांतील पीएम २.५ एयर क्वालिटी रेटिंग ५० पेक्षा जास्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जगातील आघाडीच्या दहा प्रदुषित शहरांमध्येभारतातील ९ शहरांचा समावेश आहे. चीनमधील होटान शहराची हवा जगभरात सर्वाअधिक विषारी राहिली आहे. या शहराचा पीएम २.५ रेटिंग २०२० मध्ये सरासरी ११०.२ इतका राहिला आहे. त्यानंतर भारतातील गाझियाबाद या शहराची हवा सर्वाधिक विषारी आहे. जगातील सर्वाधिक विषारी शहरात गाझियाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर बुलंदशहर, चौथ्या क्रमांकावर बिसरख जलालपुर, पाचव्या क्रमांकावर भिवाड़ी, सहाव्या क्रमांकावर नोएडा, सातव्या क्रमांकावर ग्रेटर नोएडा, आठव्या क्रमांकावर कानपूर, नवव्या क्रमांकावर लखनौ आणि दहाव्या स्थानावर दिल्लीचा क्रमांक लागतो. जगातील आघाडीच्या दहा शहरांत भारतातील नऊ शहरांचा समावेश आहे. गाझियाबादमधील हवा देशात सर्वाधिक विषारी असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालेआहे.
भारत, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील तब्बल ९८ शहरांची हवा अधिक विषारी होत चालली आहे. यामध्येभारतामधील ४६ शहरांचा समावेश आहे. दिवाळीमध्येदिल्लतील हवा सर्वाधिक प्रदुषित असल्याचेपाहायला मिळते, मात्र दिल्लीप्रमाणेच इतर ४५ शहरांची हवाही दुषित झाल्याचेचित्र निर्माण झाले आहे.काही ठिकाणाची हवा, राहण्यायोग्य नसल्याचेही बोललेजात आहे. प्रदुषणाच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. पुढील काही वर्षात ही परिस्थिती न बदलल्यास या शहरांमध्ये राहणं कठीण होणार आहे. श्वास गुदमरु शकतो. अनेकांना श्वसनाचे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणं गरचेचं आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …